सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
रोहे-कोलाड मार्गावरील साईडपट्टी धोकादायक बनली असून संभाव्य अपघाताचा धोकाही वाढला आहे.
रोहे-कोलाड राज्यमार्ग कोलाडकडे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामारीला तर रोह्रयाकडे अलिबाग, मुरूड, पेण,पनवेल आदी शहराकडे जात असल्याने तसेच याच मार्गावरून धाटाव,विळे-भागाड,महाड,साळाव आदी औद्योगिक वसाहतींकडे जाणारी अवजड वाहने यामुळे
या मार्गावर रात्रंदिवस मोठी रहदारी आढळून येते.या वर्षीच्या सुरूवातीच्या पावसातच बराचसा रस्ता हा खड्डेमय झाल्याने येथून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना फार मोठी कसरत करावी लागते.तर त्यातच भरीर भर म्हणून ठिकठिकाणी साईडपट्टीही नादुरुस्त झाल्याने संभाव्य अपघाताचा धोकाही येथे वाढला आहे.
दरवर्षी हा मार्ग पावसाळ्यात खड्डेमय बनत असतो.त्यामुळे पावसाळ्यात खड्डे भरण्याचे काम हे नित्यनेमाने चालते.परंतू मोठी रहदारी असणाऱ्या या मार्गाचे पावसाळ्यानंतर खड्डे बुजवून कारपेट टाकणे गरजेचे आहे. परंतू तशाप्रकारची खबरदारी कधीही घेतली जात नसल्याचे नित्य प्रवास करणारे प्रवासी व वाहनचालकांचे म्हणणे आहे. त्यातच साईडपट्टीचे दुखणेही कायमस्वरूपी या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना सहन करावे लागत आहे. सद्यस्थितीत ठिकठिकाणी साईडपट्टीवर चिखलाचे साम्राज्यासह मोठमोठे पडलेले खड्डे मोठ्या वाहनांसह व दुचाकी स्वाराना मार्गक्रमण करताना धोकादायक ठरत आहेत. अशा परिस्थितीत संबंधित विभागाने साईडपट्टीची दुरूस्ती करुन वाहनचालकांना दिलासा मिळवून द्यावा असे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवासीवर्गाकडून बोलले जात आहे.






Be First to Comment