Press "Enter" to skip to content

खालापूरात श्री स्वामी समर्थ मठ‌ फलकाचे अनावरण : लवकरच साकारणार स्वामी समर्थ मठ‌

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

श्री स्वामी समर्थांचे मठ खालापूरात व्हावे अशी स्वामींच्या भक्तगणांनी इच्छा होती.अखेर स्वामींच्या आशिर्वादाने हि इच्छा मार्गी लागली असून लवकरच पूर्ण होणार आहे.

खालापूरात स्वामींचे मठ साकारणार असल्याने स्वामी भक्तांच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.याकरिता श्री स्वामी समर्थ मठ‌फलकाचे अनावरण मठाचे संस्थापक नरहरी पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी नरहरी पाटील,दिपक बोंदार्डें, हेमलता चिंबुलकर, सुधीर म्हात्रे, अनिल शिंदे, दत्तात्रेय चाळके, विजय सावंत,उमेश पडवळकर,काका निगडे, मंगेश चाळके,संजय वाडेकर,गौरव जगताप,शैलेश भोसले, राजेश पवार, दिपक जगताप आदी उपस्थित होते.खालापूरात मठाचे काम श्री समर्थ मठाचे संस्थापक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पूर्ण होईल असा विश्वास स्वामी भक्तांना आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.