Press "Enter" to skip to content

कोरोनाच्या काळात अलिबाग-रेवदंडा परिसरात खळबळ

तब्बल 65 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या उमठे धरणातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह

ऐन पावसाळ्यात भेडसावणार पाणी प्रश्न

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)

अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून 60 ते 70 गावांना पाणी पुरवठा केला जातो. बुधवारी पाण्याच्या टाकीत मृतदेह असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. यामुळे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ऐन कोरोनाच्या काळात ही घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ऐन पावसाळ्यात या परिसरातील गावांना पाणी भेडसावण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील पाण्याच्या टाकीत पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

काशीनाथ हंबीर (40) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. ३ ते ४ दिवसापूर्वी तो व्यक्ती टाकीत पडला असल्याची माहिती आहे. मंगळवारी तो आढळून आला. त्यामुळे मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. मात्र, या घटनेमुळे उमटे धरणातून होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तीन दिवस बंद राहणार असून यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होणार आहेत. उमटे परिसरात राहणारे काशिनाथ नावाचे व्यक्ती रविवारी गायब झाले होते. बुधवारी पाण्याच्या टाकीत काशिनाथचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.

या घटनेची रेवदंडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.आता या टाकीत ब्लिचिंग पाऊडर टाकून पाण्याच्या टाकीची स्वच्छता करण्यात येत आहे. दोन दिवस हे साफसफाईचे काम करण्यात येणार आहे. तसेच गावात ज्या ज्या ठिकाणी या टाकीतून पाणी जाते, तेथेही वॉश आऊट करण्यात येणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.