Press "Enter" to skip to content

सकल आदिवासी संस्थेने जपली सामाजीक बांधिलकी

तृतीयपंथी समाजाच्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

कोविड संकटाचा सामना सर्वच समाजघटक करत आहेत समाजातील वंचित घटकांना याचा मोठा अधिकच फटका बसलेला आहे अशातच कल्याण शहरातील सकल आदिवासी संस्थेच्या वतीने तब्बल शंभराहून अधिक तृतीयपंथीयांना राशनसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.

सदर या वाटपासाठी टीम परिवर्तनच्या अनिकेत बारापात्रे, भुषण राजेशिर्के आणि अविनाश पाटील या युवकांचे मोलाची मदत अथवा सहकार्य लाभत आहे तर सुचिता बारापात्रे, योगिनी कोसराबे, संगीता निनावे, कांता आष्टीकर हे संपूर्ण या वस्तू वाटप कामांचे नियोजन करत आहेत. वाटप केले जात असलेल्या प्रत्येक राशनकिटमध्ये तांदुळ, पीठ, डाळ, तेल, साखर, मीठ, साबण असे जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. सकल आदिवासी संस्था वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबवत असते सध्याची गरज लक्षांत घेता संस्थेच्या वतीने राशनकिट वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले होते.

अनेक समाजघटकांसारखाच तृतीयपंथी समाज कायमच वंचित आणि दुर्लक्षित राहत असतात त्यामुळे आपल्या परीने त्यांना कोरोना काळात मदतीचा हात म्हणून छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न सकल आदिवासी संस्थेच्या माध्यमाने कल्याण डोंबिवली परिसरातील गोविंदवाडी, शहाड, आणि आंबिवली या परिसरात लोकांना या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.