Press "Enter" to skip to content

ऐन पेरणीच्या वेळी गर्दी होणार नाही – भाई मोहन गुंड

शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदी साठी कृषी दुकाने 24 तास चालु ठेवण्याची शेकापची मागणी

सिटी बेल । बीड । प्रतिनिधी ।

दोन वर्षापासून देश संकटात आहे मात्र या देशाचा अन्नदाता आर्थिक दृष्ट्या खचून गेला आहे शेतीमध्ये पिकवलेल्या मालाला भाव नाही विक्री होत नाही तर पालेभाज्या करणाऱ्या शेतकऱ्यांना विक्रीसाठी परवानगी नाही. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

जे शेतकरी कुटुंब कोरोना संक्रमित झाले त्या कुटुंबाचे आज खूप अर्थीक हाल होत आहेत,आज पेरणीचे दिवस तोंडावर आले दाहा पंधरा जुन पर्यंत पेरणी सुरु होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे बी बियाणे खरेदीसाठी शहरात जाता येत नाही शहरात बी बिर्याणी चे दुकान लॉकडाऊन मुळे बंद आहेत ऐन वेळेस दुकान खुली केली तर खरेदी साठी शेतकऱ्यांची दुकानावर गर्दी होईल गर्दी झाल्याने कोरोनाचे संक्रमण वाढण्याची दाट शक्यता आहे.

यामुळे बी बियाणे विक्रते कृषी दुकानदार यांना 24तास दुकान उघडण्याची परवानगी देऊन सोशल डिस्टन ठेवून विक्री करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड हे बीड जिल्हा अधिकारी, विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असे भाई मोहन गुंड यांनी प्रसिध्दी पत्रात म्हटले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.