सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
दिनांक 27 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीमध्ये रायगड युवक फाऊडेशन व परमानंद आश्रम ट्रस्ट दादर पेण आयोजित भारतीय महिला पोलीस मार्गदर्शन मेळावा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात सामील होण्या साठी रायगड जिल्ह्यांतील विविध तालुक्यांतून 30 मुलीनी सहभाग घेतला होता त्यांतील 10 मुली गुणवत्तेत उतरल्या, त्याना या शिबिरात प्रशिक्षणार्थी म्हणून प्रवेश देण्यात आला होता.
परमानंद आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे उरणचे जेष्ठ पत्रकार प्रदिप पाटील व आपत्तीतज्ञ जयपाल पाटील,खजिनदार जनार्दन पाटील तसेच आश्रमांतील अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हे शिबीर संपन्न झाले.
शिबिराथीना मार्गदर्शन करताना प्रदिप पाटील म्हणाले. जीवनात क्रांती घडवायची असेल तर संघर्ष करावा लागतो, समाजात नारीशक्ति या संघर्षमय क्रांतीचे उत्तम उदाहरण आहे.याच क्रांतीच्या बळावर समाज्याला बदलण्याची शक्ति महिलामध्ये आहे.अनंत काळापसून आपण पहात आलो शांत असणारी आदिमाया शक्ति कधी दुर्गा झाली कधी चंडिका झाली, काळानुसार तिने आपली रूपे बदली आहेत.आज महिलांनी विविध कलाक्षेत्रे,विज्ञान,संशोधन,क्रीडा,प्रशासन,राजकरणा पासून अंतराळा पर्यंत आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.हेचतत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजिने ओळखून सुप्त असणाऱ्या नारीशक्तीला जागे करण्याची संधी निर्माण करून दिली आत्मनिर्भर योजना सुरु करून सैन्यदलात भरती होण्या साठी प्रोस्ताहित केले आणि म्हणून आज रायगडच्या हिरकण्या सैन्य आणि पोलीस दलात जाण्यासाठी सज्जझल्या आहेत.जरुरी होती ती केवळ त्यांना मार्गदर्शन करण्याची, आज ती जबाबदारी रायगडचे सुपुत्र आपत्ती व्यवस्थापनेतील तज्ञ रायगड भुषण जयपाल पाटील यांनी पूर्ण केली आहे,त्यामुळे सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो आणि तुमच्या सारख्या हिरकण्या आज सैनिकात जाण्या साठी सज्ज झाल्याने तुमचे कौतुक करतो त्याचबरोबरीने तुम्हाला सैन्यात पाठविण्या साठी तयार झालेल्या तुमच्या पालकांना धन्यवाद देतो.असे मत उरणचे जेष्ठ पत्रकार प्रदिप पाटील यांनी व्यक्त केले ते रायगड युवक फौडेशन व परमानंद आश्रम ट्रस्ट दादर पेण आयोजित भारतीय सैन्य महिला पोलीस मार्गदर्शन मेळावा शिबिरा प्रसंगी आपले विचार व्यक्त करीत होते.
ते पुढे म्हणाले, मितुम्हला हिरकणी म्हणून संबोधले कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पदपावनस्पर्शाने पुनीत झालेल्या रायगडच्या भूमीत जन्म घेतला आज महाराज्यानी संघर्ष करून क्रांती घडविलीनसती तर भारतदेश हे हिंदूंचे साम्राज्य उदयास आले नसते त्याचे स्वतंत्र्य टिकविणे ही आपली जबाबदारी आहे.देशावर ज्याज्यावेळी संकटे आली त्यात्यावेळी महाराष्ट्र धावून गेला आहे.अनित्याचा वसा सांभाळण्यासाठी तुम्ही सज्ज झाल्यात तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे.उरणात भारतीयनौदलाचे शस्त्रागार असल्याने नौदलाच्या सैनिकांना जवळून पहाण्याचा योग आला तयंचे परिश्रम आणि चिकाटी जवळून पहाण्याची संधी मिळाली अनेक महिलांनी रायगडचे नाव विविधक्षेत्रात उज्वल केले तुम्हीही कारा हीच परमानंद स्व्मिंच्या चरणी प्रार्थना वतुम्हा सर्वाना शुभेच्छाआणि आशीर्वाद असे त्यांनी शेवटी सांगितले.








Be First to Comment