Press "Enter" to skip to content

पाहा काय म्हणत आहे राज्याचे गृहमंत्री

मोठा निर्णय, महाराष्ट्रात येताना कोरोना नेगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक

मुंबई : महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. आता दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात हवाई, रेल्वे किंवा रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक असणार आहे. कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल असल्याशिवाय आता मुंबईत येता येणार नाहीये. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम असताना आता राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली, राजस्थान, गुजरात या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी संसर्ग वाढू नये म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.पाहुयात या संदर्भात गृहमंत्री महोदयांनी दिलेली ही प्रतिक्रिया.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.