Press "Enter" to skip to content

रोहा तांबडी बलात्कार व हत्या प्रकरणातील कुटुंबियांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट

बिहार पोलिसांपेक्षा महाराष्ट्र्र पोलीस तपासात सक्षम : गृहमंत्री अनिल देशमुख 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / रायगड:- धम्मशिल सावंत ✳️💠🌟🔆

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तांबडी येथील बलात्कार व हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी भेट घेतली. व कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड आदी उपस्थित होते.

तांबडी येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. मानवतेला काळिमा फासणाऱ्या 26 जुलै रोजी घडलेल्या या घटनेने रायगडसह राज्यभरात संतापाची लाट उसळली. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मराठा समाजाच्या वतीने जोरदार मागणी केली होती. याच मुद्यावर मराठा क्रांती मोर्चा देखील आक्रमक झाला. व येत्या अधिवेशनात मराठा क्रांती मोर्चा मंत्रालयावर धडकेलं असा इशारा दिला होता. या पाश्वभूमीवर गृहमंत्र्यांची तांबडी भेट महत्वपूर्ण मानली जात असून गृहमंत्री अनिल देशमुख आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला.
सुशांत सिंग आत्महत्या तपास प्रकरणावर बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीसांना 58 राष्ट्रपती पुरस्कार अद्याप पर्यंत भेटले आहेत. यामध्ये तपासाकरीता 10 पुरस्कार महाराष्ट्राला भेटले आहेत. बिहार चे नाव न घेता गृहमंत्री म्हणाले की त्यांना किती पुरस्कार भेटले. आपल्याला कोणाशी तुलना करायची नाही. अनिल देशमुखांनी बिहार पोलीस व महाराष्ट्र पोलीसांमध्ये महाराष्ट्र पोलीस सक्षम असल्याचा सांगितले. काँग्रेस प्रकरणी मात्र बोलण्यास नकार देत हा त्याचां अतंर्गत प्रश्न असलल्याचे ग्रुहमंत्री अनिल देशमुख बोलले.

रोहा तांबडी बलात्कार प्रकरणावर बोलताना सदर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविणार , उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री म्हणाले. राज्यात ईपासची सक्ती कायम राहणार .. एसटी प्रवाशांना ईपास संदर्भात विचार करणार असल्याचे गृहमंत्री देशमुख म्हणाले.

अनिल देशमुख… महत्वाचे मुद्दे

1) रोहा बलात्कार प्रकरण … फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविणार , उज्जवल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात येणार …


2) राज्यात ईपासची सक्ती कायम राहणार .. एसटी प्रवाशांना ईपास संदर्भात विचार करणार ..

3) काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोप हा अंतर्गत विषय …

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.