कोरोना काळात स्वतःची काळजी घेऊन सुरक्षित रहा- अध्यक्ष निवृत्ती पाटील 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रशांत पोतदार) 🔶🔷🔶🔷
रामवाडीच्या राजाच्या साखरचौथ गणरायाची मिरवणूक दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये काढण्यात येत असते. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे शासनाच्या नियमाचे पालन करत साध्या पद्धतीने गणरायाची मिरवणूक काढण्यात आली.
गेले अनेक वर्षे साखरचौथ गणरायाचा उत्सव रामवाडीचा राजा (मंडळ) मोठ्या उत्साहात साजरा करत आला आहे.म यावर्षी ना ढोल ना ताशे नसले तरीही रामवाडीच्या राजाची मिरवणूक मोठ्या उत्साहातच पार पडली.
एक शिस्तबद्ध मंडळ म्हणून पेण शहरासह तालुक्यात रामवाडीच्या राजाचे नाव असल्यामुळे सन २०१६ सन २०१७ या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये एक शिस्तबद्ध मंडळ म्हणून रामवाडीचा राजाला पेणचे प्रांतअधिकारी यांनी सन्मानित केले आहे.रामवाडीच्या राजाचा विसर्जन सोहळा दरवर्षी ढोल ताशांच्या गजरात वाजत- गाजत जल्लोषात असतो.मात्र यावेळी कोरोनाच्या संकटामुळे साध्या पद्धतीने मिरवणूक झाली.तर यावेळी, सद्यस्थितीला कोरोना नावाचे संकट असल्यामुळे हा साखरचौथ गणपती उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती पाटील यांनी दिली.
तसेच कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्वांनी आपली काळजी सुरक्षीत रहा असे आवाहन निवृत्ती पाटील यांनी केले तर कार्याध्यक्ष विनायक पाटील उपाध्यक्ष संदीप पाटील, खजिनदार निलेश म्हात्रे तसेच सुहासिनी महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.


Be First to Comment