Press "Enter" to skip to content

क्रांती दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून ११ हजारांहुन अधिक पत्रे पाठविणार

सीमाप्रश्नाबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोहिमेला मराठी वकील संघटनेचा पाठींबा

सिटी बेल | बेळगाव |

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ११ हजारांहुन अधिक पत्रे पाठविण्यात येणार आहेत. या मोहिमेत सहभागी होऊन बेळगाव व इतर भागातून देखील मोठ्या प्रमाणात पत्रे पाठविली जावी यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेला मराठी वकील संघटनेतर्फे पाठींबा देण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाची तातडीने सोडून व्हावी यासाठी प्रयत्न करा अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्याचा निर्णय खानापूर तालुका युवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. तसेच 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी एकाच दिवशी ११ हजाराहून अधिक पत्रे पाठविण्याबाबत जनजागृती केली जात आहे. याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असून फक्त खानापूर तालुका नव्हे. तर बेळगाव, निपाणी व इतर सीमाभागातून देखील पत्रे पाठविली जावीत याला सिमाभागातून व्यापक पाठिंबा प्राप्त व्हावा व लाख भर पत्र पोस्ट व्हावीत यासाठी विविध स्तरातील लोकांची भेट घेऊन पत्र पाठवण्याचे आवाहन केले जात आहे.

खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, दामोदर नाकाडी, ज्ञानेश्वर सनदी आदींनी मराठी वकील संघटनेची भेट घेतली आणि हाती घेण्यात आलेल्या मोहिमेची माहिती देऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी ऍड महेश बिर्जे, ऍड शाम पाटील, ऍड अमर येळ्ळूरकर, ऍड यशवंत सुतार, ऍड शंकर पाटील, ऍड शामराव पाटील, एम बी बोन्द्रे, ऍड आर एल नलवडे, ऍड जयराज मोदगेकर, ऍड दीपक काकतीकर, ऍड कमलेश मायाण्णाचे, ऍड महेश मोरे, ऍड संजय चौगुले, ऍड सौरभसिंह पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.