Press "Enter" to skip to content

ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेची राज्यपालांकडे मागणी

महाराष्ट्रात वाढीव गावठाण विस्तार योजना तात्काळ सुरू करा 🔷🔶🔷


सिटी बेल लाइव्ह । समिर बामुगडे । रोहा । 🔶🔷🔶


ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांमध्ये निराधार,बेघर कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी व क्रीडा मैदाने, उद्याने, सार्वजनिक शौचालये,वाचनालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा,समाज मंदिरे यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी महाराष्ट्रामध्ये सर्वत्र “वाढीव गावठाण विस्तार योजना” पुनःश्च कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.भगतसिंग कोशारी यांची राजभवन,मुंबई येथे भेट घेऊन केली आहे.

किसान मोर्चचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा कोकण संपर्क प्रमुख सुनिल गोगटे,ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष समाजसेवक संतोष ठाकुर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईर नगरसेवक निलेश बाविस्कर, माथेरानचे शहर अध्यक्ष विलास पाटील यांच्यासह कर्जत तालुका व्यापारी आघाडी अध्यक्ष सुनील सोनी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.भगतसिंग कोशारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेत माथेरान येथे ई-रिक्षा सुरू करणे व महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींमध्ये वाढीव गावठाण विस्तार योजना तात्काळ राबविण्याची मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की कर्जत तालुक्यातील माथेरान येथील दस्तुरी ते माथेरान ही वाहतूक घोड्यावर बसून अथवा सायकल रिक्षा किंवा मानवी वाहतूक पद्धतीने होते ही अमानुष वाहतूक थाम्बवून ई-रिक्षा चालू करावी ही स्थानिकांची मागणी असताना पर्यावरण आणि वन मंत्रालय त्यास परवानगी देत नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने ई-रिक्षा चालू करणेसंबंधी अध्यादेश काढून केंद्र सरकारकडे मागणी करावी अशी विनंती किसान मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य सुनील गोगटे यांनी केली तर महाराष्ट्रांतील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांसाठी वाढीव गावठाण देण्याची मागणी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने समाजसेवक संतोष ठाकूर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मागील चाळीस वर्षांपासून गावांमध्ये निराधार,बेघर कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी व क्रीडा मैदाने,उद्याने, सार्वजनिक शौचालये,वाचनालये, प्राथमिक आरोग्य केंद्र,शाळा,समाज मंदिरे यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी गावठाण जमीन असणे गरजेचे असताना सन १९८० ते आजपर्यंतच्या चाळीस वर्षांत राज्य शासनाची “वाढीव गावठाण विस्तार योजना” प्रभावीपणे न राबविल्याने ग्रामपंचायतिना पायाभूत सुविधां पुरविण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत हे लक्षात घेऊन महाराष्ट्रामध्ये सर्वत्र “वाढीव गावठाण विस्तार योजना” पुनःश्च कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी केली यावेळी राज्यपालांसोबत झालेल्या चर्चेत माथेरानमधील ई-रिक्षांबाबत व वाढीव गावठाण विस्तार योजनेबाबत सचिवांना कळविले जाईल असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याने भविष्यात गावांचा वाढीव गावठाणाचा प्रश्न मार्गी लागेल अशी प्रतिक्रिया ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.