सिटी बेल लाईव्ह प्रतिनिधी/ मुंबई.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या रेल्वे गाड्या सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ९ ऑक्टोंबरपासून पाच एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याची घोषणा मध्य रेल्वेने आज केली. यामुळे महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळाला आहे.
यामध्ये मुंबई ते नागपूर दुरांतो स्पेशल, मुंबई ते पुणे सुपरफास्ट स्पेशल ट्रेन १० ऑक्टोबर पासून, मुंबई ते गोंदिया सुपरफास्ट, मुंबई ते सोलापूर सिद्धेश्वर सुपरफास्ट आणि मुंबई ते पुणे सुपरफास्ट या गाड्या ९ ऑक्टोबर पासून धावणार आहेत. आरक्षित तिकीट असणारे प्रवासीच या गाडयांनी प्रवास करू शकणार आहेत.
८ ऑक्टोबर पासून प्रवासी या स्पेशल गाड्याचे आरक्षण करू शकतात.
१७ ऑक्टोबर पासून मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद तेजस एक्सप्रेस धावणार आहे. कोरोनामुळे १९ मार्च पासून तेजस ट्रेन बंद करण्यात आली होती. मुंबई ते पुणे मार्गांवर धावणाऱ्या डेक्कन क्वीन आणि इंद्रायणी ट्रेन सुरु होणार आहेत. कोरोना काळात या गाड्या विशेष ट्रेन म्हणून धावणार आहेत.
Be First to Comment