सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
कोरोनाच्या पार्श्वभूमीचा संदर्भ देऊन दळणवळण बंदीनंतर आता मंदिरे सोडून सर्व काही हे सरकार सुरू करीत आहे, दारूचे दुकाने, माॅलची दूकाने, क्रिकेट मॅच, एस टी बस, आतातर रेस्टाॅरंट व बारही सुरू करण्यात आले आहेत. म्हणुन राष्ट्रीय वारकरी परिषद याचा जाहीर निषेध करत आहे असे राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापूमहाराज रावकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकामार्फत जाहीर केले आहे.
ह.भ.प. बापूमहाराज रावकर यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी व शुरविरांची भूमी आहे शिवरायांनी हिंदु मंदीराचे रक्षण करून हिंदु धर्माला उर्जा दिली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संतश्रेष्ठ नामदेव महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, रामदास स्वामी अशा असंख्य साधु संतांनी भक्तीमार्ग जगाला शिकवला त्याचाच परिणाम म्हणुन जगभरातील लोक अध्यात्माची शिकवण घेण्यासाठी भारतात येतात पण संतांची शिकवण ७० वर्षात हे सरकार देऊ शकले नाही त्यामुळे आज माणुस माकडापेक्षाही हिनतेचे दर्शन घडवत आहे. भारतभर बलात्कार होत आहेत त्यामध्ये भारतात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकावर आहे ही गंभीर बाब पाहत असताना त्यात जनतेला अजुन दारूच्या नशेत ठेवण्याचे व ईश्वर दर्शना पासुन वंचीत ठेवण्याचे षडयंत्र हे सरकार करत आहे हे अत्यंत वाईट असुन हे निंदनीय आहे व आम्ही वारकरी याचा तीव्र निषेध व्यक्त करत आहोत मद्यापेक्षाही आज जास्त मनः शांतीची आवश्यकता आहे सर्व रोजगार बुडालेला आहे माणूस घरात असूनही अस्वस्थ आहे व याला मनःशांति साठी मंदीरातील आध्यात्माची आणि दर्शनाची आवश्यकता आहे. राज्यात घडणाऱ्या या प्रकारांसाठी अध्यात्माचाच प्रमुख आधार आहे.
घटनेने धार्मिक स्वातंत्र्य दिले असतानाही उपासना देवदर्शन यापासून वंचित ठेवण्याचे महापाप हे सरकार करत आहे हिरण्यकश्यप हा एक राजा होता आणि तो भक्त प्रल्हाद यांना भक्ती करण्यास विरोध करत होता याच प्रमाणे हे सरकार नास्तिकवादांच्या नादाला लागून धर्मद्रोही, संतविरोधी निर्णय घेत आहे याचा आम्ही वारकरी तीव्र जाहीर निषेध करत आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय वारकरी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री यांनीही या प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.
Be First to Comment