सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔶🔶🔷
मराठा आरक्षणाला सर्वोंच्य न्यायालयाने स्थगिती दिली.त्यामुले नोकरभरती व शैक्षणिक सवलतीमध्ये आरक्षणाचा कोणताही लाभ मराठा मुला-मुलींना मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष असून आपल्या मागण्यांसाठी मराठा समाजाने येत्या १० ऑक्टोंबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.पूर्णं ताकदीनिशी तो बंद यशस्वी करा असे आवाहन मराठा आरक्षण संघर्ष समितीने केले आहे.
गेल्या तीस वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असून ५८ मूक मोर्चे,४२ समाजबांधवांचे बलिदान असा प्रदिर्घं संघर्षं केल्यानंतर मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले.परंतू सर्वोच्च न्यायालयाने त्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली.त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी आंदोलन होत आहेत.मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा केली गेली आहे असे मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेशदादा पाटील यांनी सांगितले.
यावेळी त्यांचे कट्टर समर्थक वावर्ले चौक(खालापूर) येथील कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दीपक गणपत पाटील,भरत पाटील (कोल्हापूर), सुशांत पाटील (नवी मुंबई), वंदना मोरे(सुधागड पाली),श्रीकांत शेलके,सतीष कोली,समीर ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी समितीच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या.
मराठा आरक्षणाला दिलेली अंतरीम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने प्रभावी पावले उचलावीत.
आरक्षणाला अंतरिम स्थगिती असल्याने मराठा मुला-मुलींना सर्व प्रकारच्या शैक्षणिक फिचा परतावा शासनाकडून मिळावा.
मराठा आरक्षणाबद्दल अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतीही भरती करु नये आदी मागण्यांसाठी येत्या १० ऑक्टोंबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आल्याचे वावर्ले चौक (खालापूर) येथील दिपक गणपत पाटील यांनी सांगितले.
Be First to Comment