शहीद विवेक रहाडे तुमचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही – भाई जयंत पाटील 🔶🔷🔷🔶
शहीद विवेक रहाडे या बीड मधील तरूणाने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे आत्महत्या केली यामुळे मी खूप दुःखी झालो आहे . विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले.त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत अशा भावना शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या.
आमदार जयंत पाटील पुढे म्हणाले की, घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू ! याचा मला विश्वास आहे.हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही. जो पर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत शेतकरी कामगार पक्ष सरकार दरबारी पाठव पुरावा करीत राहील.
Be First to Comment