शेकापचे युवा नेते भाई मोहन गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन 🔷🔶🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / बीड (प्रतिनिधी) 🔶🔷🔶🔷
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधी अनेक निर्णय घेतलेले आहेत,शेतकरी कधी कोरड्या दुष्काळाने तर कधी ओल्या दुष्काळाने संकटात सापडलेला आहे, त्या मध्ये कोरोना सारख्या महामारीने शेतकऱ्यावर खूप मोठे आर्थिक संकट आलेले आहे, यातच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून एक प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे.
जागतिक बाजार पेठेत भारतीय कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी आसुन त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरी चार पैसे पडतील अशी अशा होती मात्र केंद्र सरकारने निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय हा शेतकर्यांचे आर्थीक नुकसान करणारा आहे, या मुळे शेकापचे युवा नेते भाई मोहन गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली केज माजलगाव बीड धारूर वडवणी आंबेजोगाई परळी गेवराई या तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन व एक किलो कांदे देऊन निषेध केला आहे.
या मागणीचा विचार करून तात्काळ निर्यात बंदी उठवावी अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे निवेदनाच्या प्रती
केंद्रीय कृषी मंत्री नवी दिल्ली भारत
खासदार प्रितम मुंडे बीड यांना पाठवल्या आहेत.
माजलगाव तहसीलदार यांना निवेदन देताना अॅड नारायण गोले पाटील लहू सोळुंके राहुल मापारे राम चोरगे हनुमान शिंदे समाधान पोळ तेजस सिद्धेश्वर गायकवाड वैजनाथ कटके बालाजी कटके अॅड आनंत बादाडे,
केज तहसीलदार यांना निवेदन देताना,
भाई अशोक रोडे शत्रुघन तपसे जी डी देशमुख भाई मंगेश देशमुख भाई शेबाज फारुकी,
धारूर तहसीलदार यांना निवेदन देताना भाई मोहन गुंड पापा सोळुंके अमोल सावंत अशोक सोळुंके प्रभाकर हरवे सिताराम हरवे,
बीड तहसीलदार यांना निवेदन देताना
अॅड संग्राम तुपे पंडीत तुपे भाई दत्ता प्रभाळे भाई भीमराव कुटे अर्जुन सोनवणे सखाराम शिंदे बापू शिंदे.
परळी भाई निलेश पानखडे भाई शिवाजी सूर्यवंशी भाई माउली जाधव भाई रमेश ओव्हाळ.
वडवणी भाई अनिल कदम भाई अशोक गाडे भाई राजू सय्यद,या तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी एक किलो कांदे व एक निवेदन तहसीलदार यांच्याकडे दिले आहेत.
Be First to Comment