सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔶🔷
जेएनपीटी बंदरातून निर्यात होणारा हजारो टन कांदा अडकून पडला असल्याचे समजते. यामुळे कांदा निर्यातदारांना रडवले आहे.
जेएनपीटी बंदरातून निर्यात होणारा १० हजार मेट्रिक टन कांदा अडकून पडला आहे. यामुळे कांद्याने निर्यातदारांच्या डोळ्यातून पाणी काढलं आहे.
केंद्रशासनाने कांदा निर्यात बंदीच्या घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातल्या कांदा उत्पादकांच नुकसान होणार आहे. आता निर्यातदारांचही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
केंद्र शासनाच्या या निर्णयानंतर जेएनपीटी बंदरातून जहाजावर लादला जाणारा मालही निर्यातीसाठी थांबाविला आहे. त्यामुळे या परिसरात जवळपास ३५० कंटेनर म्हणजेच १० हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे १०० ते १२० निर्यातदारांचं नुकसान होणार असल्याचे कांदा निर्यातदारांनी सांगितले आहे.
Be First to Comment