पाईप कंपनीने पाणी प्रदुषीत केल्याने ग्रामस्थांवर ओढवले पाणी टंचाईचे संकट 🔷🔶🔷🔶
कारखाना बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / रायगड : धम्मशिल सावंत 🌟💠🌟💠
रायगड जिल्ह्यातील असंख्य गावे, आदिवासी वाड्या पाड्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर आहे. उन्हाळ्यामध्ये ग्रामिण भागात पाणी टंचाईची समस्या डोकेवर काढते. मात्र रायगड जिल्ह्यातील कोस्ते या गावात भर पावसात येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. शासकिय अधिकारी, लोकप्रतिनिधींकडे गाऱ्हाणे मांडुन देखिल कोस्ते ग्रामस्थांना न्याय मिळत नाही.
माणगाव तालुक्यातील कोस्ते हे मुख्य रस्त्यावरील एक गाव, गावात तशी कोणतीच समस्या नाही. गावात रोजगार मिळावा म्हणुन दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने जेटीएल या पाईप बनविणाऱ्या कंपनीला प्लँट उभारण्यासाठी ना हरकत दिली. गेल्या काही दिवसां पासुन हि कंपनी गॅव्होनाईज पाईप बनवित आहे. यामुळे बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे काळ नदीचे पाणी प्रदुषीत झाले असुन गावावर पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. शासनाने आम्हाला न्याय द्या, पिण्यासाठी शुद्ध पाणी द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
Be First to Comment