Press "Enter" to skip to content

आव्हानांवर मात करीत जेएनपीटीने नोंदवली कार्गो हाताळणीमध्ये वाढ


कोरोना लॉकडाऊन दरम्यान जेएनपीटीने केली 1,643,784 टीईयू आणि 694 जहाजांची हाताळणी 🔷🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह / उरण (घनःश्याम कडू) 🔶🔷🔶🔷

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हेभारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. लॉकडाउनच्या निर्बंधांमध्येशिथिलता आणि देशांतर्गत आर्थिक व्यवहारातसुरूझाल्यानेजेएनपीटीमध्ये मालवाहतूकीमध्ये निरंतर वाढ झाली आहे.

कोविड 19 च्या साथीच्या काळात भारतातील सर्व व्यवसाय ठप्प झाले असताना मालवाहतुकीमधील ही प्रगती म्हणजे सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये लवकरच सुधारणा होण्याचे निदर्शक आहे, जे सध्या अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

लॉकडाऊन दरम्यान जेएनपीटीला विविध आव्हानांचा सामना करावा लागला, तरी सुद्धा जेएनपीटीने 31ऑगस्ट,2020 पर्यंत 1,643,784 टीईयू आणि 694 जहाजांचीहाताळणी करीत उल्लेखनीय कार्य केले आहे.

लॉकडाउनच्यासुरुवातीच्या कालावधीत माल हाताळणीमध्ये35 टक्क्यांहून अधिक घट झाली होती, परंतु ऑगस्ट महिन्यापर्यन्त हळू-हळू ही घट 16.61% पर्यंत खाली आली आणि आता पोर्ट आपल्या कोविडच्या पूर्व कामगिरीच्या पातळीवर पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आतापर्यंतच्या कामगिरीच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की यापुढेही जेएनपीटी अशीच प्रगती सुरू ठेवेल.

लॉकडाउन सुरू झाल्यापासूनच, जेएनपीटीने आपले भागधारक, कर्मचारी, शिपिंग कंपन्या आणि स्थानिक समुदायासाठी अनेक उपाय योजना केल्या. योग्य वेळेवर केल्या गेलेल्या या उपाययोजनांमुळे जेएनपीटी प्रत्येक महिन्यात आपल्या कामगिरीत सुधारणा करीत आहे.

जेएनपीटीने जुलै 2020 महिन्यात हाताळणी केलेल्या 3,44,316 टीईयूच्या तुलनेत ऑगस्ट 2020 महिन्यात 3,52,735 टीईयूची मालाची हाताळणी केली आहे. ऑगस्ट, 2019 मध्ये जेएनपीटीने 5.68 दशलक्ष टन मालाची हाताळणी केली होती, त्या तुलनेत ऑगस्ट, 2020 महिन्यात जेएनपीटीनेएकूण 4.74 दशलक्ष टनमालाची हाताळणी केली आहे. जेएनपीटीच्या कामगिरीविषयी बोलताना पोर्टचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, बंदरे ही लॉजिस्टिक साखळीतील महत्त्वाचा दुवा असतात आणि गेल्या काही महिन्यांत जेएनपीटीने ही भूमिका अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडली आहे.

त्याच बरोबर गेल्या काही महिन्यात खालावलेल्या कामगिरीमध्ये होऊन आम्ही आता पुन्हा उभारी घेण्याच्या मार्गावर आहोत. कोविड – 19 च्या साथीच्या काळात पोर्टचे कामकाज निरंतर सुरू ठेवण्यासाठी आणि लॉजिस्टिक सप्लाय चेन सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आम्ही अनेक उपाय केले आहेत. त्याचबरोबर जेएनपीटी हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर मध्ये रुपांतरित करून आम्ही स्थानिक समुदायाला या संकटातून मुक्त होण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

आम्हाला खात्री आहे की देशातील अग्रणी कंटेनर पोर्ट असलेले जेएनपीटी हे परिवर्तनाचा पुढील टप्पा गाठेल तसेचआपले स्थान मजबूत करण्यासाठी, उद्दीष्टे साध्य करण्यासाठी व यापुढेही आपले अग्रगण्य स्थान कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील.

जेएनपीटीविषयी :
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. भारतातील मुख्य बंदरांमध्ये होणार्‍या एकंदर कंटेनर कार्गो वाहतुकीच्या सुमारे 52% कामकाज जेएनपीटी येथे चालते. 26 मे 1989 मध्ये या बंदराची स्थापना झाली असून कामकाजाच्या तीनपेक्षा कमी दशकांत जेएनपीटी हे देशातील बल्क-कार्गो टर्मिनलवरून प्रीमियर कंटेनर पोर्ट म्हणून नावारूपाला आले. जगातील 100 कंटेनर पोर्टमध्ये जेएनपीटी 28 व्या स्थानावर असून ते जगातील 200 हून अधिक बंदरांना जोडलेले आहे.

सध्या जेएनपीटी येथे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लि. (जीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी) आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल)चा समावेश आहे.

या बंदरात सर्वसाधारण कार्गोकरिता शॅलो वॉटर बर्थ आणि आणखी एक लिक्विड कार्गो टर्मिनल आहे, ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टीयमद्वारे चालते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.