सिटी बेल लाइव्ह / उस्मानाबाद 🔷🔶🔷
भारताचे माजी राष्ट्रपती ,माजी केंद्रीय मंत्री व भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे देशातील राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते एक विद्वान,मुत्सद्दी व अनुभवी नेते होते. सर्वच राजकीय पक्षाचे नेते त्यांचा सन्मान करत होते. अनेक वेळा देशात अस्थिरता निर्माण झाल्यानंतर प्रणवदा एक संकटमोचक म्हणून काम करत होते. प्रणवदांच्या निधनामुळे देशाची अपरिमित हानी झाली आहे .त्यांना महाराष्ट्र जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Be First to Comment