शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढण्यासाठी तरुणांनी शेकाप मध्ये सहभागी व्हावे – भाई मोहन गुंड 💠🌟💠🌟
सिटी बेल लाइव्ह / बीड – प्रतिनिधी 🔶🔷🔶🔷
जागतिक महामारी च्या पार्श्वभूमीवर शासनाकडून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी शेतकरी कामगार पक्षाच्या लढ्यात सहभागी होऊन शेतकऱ्यांचा विविध प्रश्नावरील लढा तीव्र करावा असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेवराई येथील सुग्रीव लाखे व बीड येथील आर्जुन सोनवणे, भवानवाडी चे श्रीकृष्ण जगताप यांनी दिनांक 25 ऑगस्ट रोजी भाई मोहन गुंड यांच्या उपस्थितीत बीड येथे शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला त्या वेळी भाई मोहन गुंड हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे देशातील मोदी सरकार व महाराष्ट्रातील ठाकरे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून टीव्हीवरील जाहिराती केवळ देखावा असुन, शेतकऱ्यांना बँका कर्ज देत नाहीत तर बि-बियाण्यांच्या कंपन्या शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन फसवणूक करतात यामुळे लाखो शेतकऱ्यांना शेती करणे अत्यंत अवघड झाले असून शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्या खाली येऊन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचाराने शेतकऱ्यांचा लढा तीव्र करावा, असे आवाहन केले.
त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ऍड नारायण गोले पाटील, भाई ॲड संग्राम तुपे ,भाई दत्ता प्रभाळे, भाई भीमराव कुटे, भाई अशोक रोडे, हनुमान शिंदे, नाना पवार सुनिकेर संगेवार सुमीत वागमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते..
Be First to Comment