Press "Enter" to skip to content

फडणवीसांचा गंभीर आरोप : पोलिसांच्या बदल्यांसाठी अर्थपूर्ण बोलणी

सिटी बेल लाइव्ह / पुणे #

 राज्यातल्या पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. पोलीस बदल्यांसाठी राज्यात अर्थपूर्ण बोलणी सुरू असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. राज्यात पोलिसांच्या बदल्यांसह इतर बदल्यांवरून वाद सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना कोरोना काळात बदल्यांचा घाट कशाला घातला जातोय ? असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे.

सरकारचा बदल्यांचा निर्णय अनाकलनीय असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. बदल्यांमुळे सरकारला आर्थिक भुरदंड पडत असल्यामुळे बदल्यांची गरज नव्हती, असं मतही फडणवीसांनी मांडलं आहे. मला चुकीच्या बदल्या करायला सांगितल्या तर मी त्या करणार नाही, गरज पडली तर सोडून देईन, असं राज्याचे डीजी म्हणत असल्याच्या बातम्या समोर येत आहे, या गोष्टी अत्यंत गंभीर असल्याचं फडणवीस म्हणाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.