माणगाव तालुक्यातील सोन्याची वाडी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 86 ग्रामस्थांना सुखरुप ठिकाणी हलविले….!
सिटी बेल लाइव्ह / रायगड:धम्मशिल सावंत #
अतिवृष्टीमुळे माणगाव तालुक्यातील सोन्याची वाडी गावाला पाण्याने वेढले. बुधवारी (ता.5) काळ नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने ग्रामस्थ अडकले होते. यातील अडकलेल्या 86 ग्रामस्थांना पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले आहे. रायगड पोलीसांनी साळुखें रेस्क्यु टिम सोबत बचाव कार्य पार पाडले. प्रशांत साळुखें, प्रणित साळुखें, प्रजित साळुखें सह महेश सानप व ईतर रेस्क्यु एक्सपर्ट ने बोटीच्या साह्याने ग्रामस्थांना हलविण्यात महत्वाचा सहभाग होता. सर्व 86 ग्रामस्थांना गोरेगाव मधील ना.म. जोशी विद्यालयात सुरक्षित हलविण्यात आल्याची माहीती रायगड पोलीसांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असल्याने येथील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरले आहे. माणगाव तालुक्यातील काळ नदीच्या किनारी धरणाजवळ असलेल्या एका फार्महाऊसवर मंगळवारी (दि.4) 25 नागरिक अडकले होते. या अडकलेल्या 25 नागरिकांना रेस्क्यू टीमच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.
Be First to Comment