Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने आदिवासी बांधवाना अन्नधान्याचे वाटप

सिटी बेल । कळंबोली । प्रतिनिधी ।

लाँकडाऊनमध्ये हातावर पोट असलेल्या आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत  रोज मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असलेल्याची उपासमारी होवू नये म्हणून पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ( ओबीसी सेल) मा. अध्यक्ष विजय मयेकर व उपाध्यक्ष जसविंदर  र्शन सिंग ़़ यांच्या हस्ते खारघर येथील आदिवासी बांधवाना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.  

राज्यातील वाढत्या कोरोनाची साखळी  तोडण्यासाठी व त्याच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने 30 दिवसाच्या लाँकडाऊनची घोषणा केली आहे.  यात शुक्रवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याचा हातावर पोट असलेल्या आदिवासी बांधवाांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.  लाँकडाऊनमध्ये गाव बंदी असल्यामुळे मोलमजुरी केल्याशिवाय यांचा उदरनिर्वाह होत नाही या आदिवासी बांधवांवर  उपासमारीची वेळ आली आहे

या बांधवावर उपासमारीची वेळ येवू नये म्हणून  राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे  अध्यक्ष  ( ओबीसी सेल)  विजय म़येकर व जसविंदर  सिंग यांच्या सहकार्यातून आदिवासी बांधवांना पंधरा दिवस पुरेल एवढ्या धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे  वाटप करण्यात आले  यावेळी समाजिक अंतर ठेवून व सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले यावेळी विजय मयेकर व त्यांचै सहकारी यांचे आदिवासी बांधवाकडून आभार मानले. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.