विचारधारा-४ *इच्छा*
इच्छेतुनी नवेच्छा फुलती, निरिच्छास काय तो गोडवा?
असे म्हणणाऱ्या
हे मानवा, ठेव जाणीव की, निरिच्छच शेवटी पोहोची परमानंदा…
एक इच्छा बाळगली की, त्यातून अनेक विकार उत्पन्न होतात. इच्छा ही स्वतःची तर अपेक्षा ही दुसऱ्यांसाठी बाळगली जाते.
उदाहरण- आज मला माझ्या मित्राबरोबर फिरायला जाण्याची इच्छा आहे पण त्याने मला त्याची गाडी शिकवावी ही माझी त्याच्याकडून अपेक्षा आहे, असा हा फरक असतो.
त्यामुळे शहाण्याने शक्यतो निरिच्छ होऊन दुसर्यांकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता कोणतेही कार्य करणे हे विशेष फलद्रूप ठरले नाही तरीही मनाला खऱ्या आनंदाचा आधार देते, हे जाणावे.
अशा वेळी जो आनंद उपभोगीला जातो, त्याची चव ही त्या देवत्वाला स्पर्श करणारी अशी परम-श्रेष्ठ असते.
✍️ लेखिका ✍️
श्वेता जोशी., नवीन पनवेल
Vichardhara chan lihile aahe…👌👌👌