सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
रसायनीत शालेय शिक्षण पुर्ण करुन आपल्या कर्तृत्वाने चित्रपट लेखक, निर्मांता, दिग्दर्शक सिकंदर सय्यद शेख यांच्या कार्याची दखल घेऊन शांतीदूत परीवाराच्यावतीने सेवारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.हा पुरस्कार दिग्दर्शक सिकंदर शेख यांना आयपीएस बाजीराव जाधव, आयपीएस समर्थन पाटील, आयपीएस आयजी डॉ.विठ्ठल जाधव यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी थर्मांकोल कंपनीचे डायरेक्टर रामदास माने, डॉ.संजय चोरडिया, डॉ.शशांक शहा, डॉ.काले आदी उपस्थित होते.
चित्रपट लेखक,निर्मांता व दिग्दर्शक सिकंदर शेख यांच्या हातून चित्रपट क्षेत्राव्यतिरीक्त सामाजिक कार्य घडत आहेत.गरजू गोरगरीबांच्या हाकेला धावून येणारा म्हणून चांगली ओळख आहे.मोहोपाडा रसायनी परीसरात असताना त्याने सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहे.निर्मांता व दिग्दर्शक सिकंदर शेख यांना सेवारत्न पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Be First to Comment