इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये उरणची जलकन्या वृद्राक्षी टेमकरची नोंद
सिटी बेल लाइव्ह । उरण घन:श्याम कडू ।
उरणमधील वृद्रक्षी या ९ वर्षीय मुलीने तब्बल २४ की.मी. सागरी अंतर पोहून पार करत विक्रम केला होता. यानंतर जिल्हाभरातून तिचे कौतुकही झाले होते. तिच्या या धाडसी प्रयत्नाची नोंद "इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड"ने घेऊन, सदर संस्थेने तिला सन्मानीतही केले आहे.
मुळची अलिबाग शहाबाज येथील वृद्राक्षी मनोहर टेमकर सध्या उरण मध्ये रहात आहे. जानेवारी २०२० मध्ये रेवस ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी २४ की.मी. अंतर पोहून जाण्याचा यशस्वी प्रयन्त वृद्रक्षीने केला होता. हे अंतर तिने ८ तास १० मिनिटात पोहून पार केले होते. अनेक अडचणींवर मात करत तिने हा विक्रम केला होता. या विक्रमाची नोंद आता "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" या संस्थेने घेतली आहे. तिच्या या धाडसी विक्रमाबद्दल "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" या संस्थेने प्रमाणपत्र तसेच मेडल देऊन सन्मानित केले आहे.
सदरचे प्रमाणपत्र पत्रकार विरेश मोडखरकर आणि तिचे कोच हितेश भोईर आणि किशोर पाटील यांच्या हस्ते वृद्रक्षीला देण्यात आले. यावेळी आपल्या स्वप्नांची पूर्तता वृद्रक्षीने केली असल्याच्या भावना तिचे वडील मनोहर टेमकर यांनी व्यक्त केली.
Be First to Comment