Press "Enter" to skip to content

कामोठे तील स्नेहल निंबाळकर ठरल्या मिसेस परफेक्ट इंडिया

ठाणे येथे संपन्न झालेल्या सौंदर्य स्पर्धेत मारली बाजी

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।

ठाणे येथील डोनाल्ड पकेट सभागृहात नुकतीच सौंदर्य स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये कामोठे येथील स्नेहल निंबाळकर यांनी पहिला रनर अप मिसेस परफेक्ट इंडिया 2021 किताब पटकावला. या यशाबद्दल निंबाळकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकले.

ही स्पर्धा राहुल यादव आणि आसावरी जोशी या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये 30 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये फक्त 12 मिस आणि मिसेस होत्या .यात स्नेहल निबाळकर यांनी पहिल्या 12 मध्ये स्थान मिळवले. मिसेस परफेक्ट इंडियाची अंतिम स्पर्धेत त्यांनी फर्स्ट रनर रपचा किताब पटकावला . नऊवारी साडी परिधान करून निंबाळकर यांनी मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवले. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा त्यांच्या सादरीकरणातून दिसली. उत्तम वेशभूषा करून त्या इतर स्पर्धकांपेक्षा सर्वोत्कृष्ट झाल्या.

विशेष म्हणजे स्नेहल निबांळकर या नुकत्याच विवाहबद्ध आलेल्या आहेत. लग्नबंधनात अडकल्या नंतर काही दिवसातच परिश्रम मेहनत घेऊन त्यांनी मोठ्या स्पर्धेत फर्स्ट रनररप किताब जिंकून बाजी मारली.

कोविड चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून याठिकाणी सामाजिक अंतर पाहण्यात आले होते. जास्त गर्दी करण्यात आली नाही. त्यामुळे निवडक उपस्थितांच्या साक्षीने ही स्पर्धा संपन्न झाली. यावेळी जयश्री सोलंकी, सिद्धी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कोट
याकरता अगोदर मला आई वडील भाऊ यांचं पाठबळ मिळालं. त्यामुळेच या क्षेत्रात मला पुढे आले. लग्नानंतर पती आशिष पोटे- पाटील त्याचबरोबर सासू-सासर्‍यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे मला हे यश संपादन करत आले. माझ्यासारख्या इतर मुलींनीही या क्षेत्रात पुढे येऊन आपले स्वप्न साकार करावे.

स्नेहल निंबाळकर, मिसेस परफेक्ट इंडिया

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.