कायद्याला 90 टक्के शेतकऱ्यांचा विरोध, मग कायदा कुणाच्या हिताचा : शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचा सवाल
सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत ।
केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी काल राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात आली. हे आंदोलन यशस्वी करणार्या सर्व कार्यकर्त्यांचे शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.
कायद्याला 90 टक्के शेतकऱ्यांचा विरोध, मग कायदा कुणाच्या हिताचा आहे असा सवाल आ जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय. तसेच, देशातील शेतकर्यांना न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचे आवाहन केले आहे.
Be First to Comment