महाविकास आघाडी कामगारांसोबत : कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना आश्वासन 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । मुंबई । 🔶🔷🔶
केंद्र सरकारचे कामगार कायदे अन्यायकारक आहेत. ते कामगारांना व कामगार क्षेत्राला मारक असुन उद्योगपतींच्या फायदयाचे आहेत. केंद्र सरकारने हे जाचक कायदे केले असले तरी महाराष्ट्र सरकार मात्र कामगारांसोबत असुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्य असेल. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्रध्व ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीदरम्यान व्यक्त केली.
आज बिकेसी येथील मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकित कामगार मंत्र्यांनी महाराष्ट्रातील विविध संघटनांच्या प्रतिनिधी बरोबर कामगार कायदयाबाबत सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान महाराष्ट्र विकास आद्याडी सरकार कामगारांवर अन्थाय होवू देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. कामगारांवर अन्याय करणाऱ्या कायदया संदर्भात पूढील बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलावून चर्चा करणार असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.
या बैठकिला कामगार नेते भाई जगताप, शशिकांत शिंदे, इंटकचे नेते महेंद्र घरत, विश्वास उटगी, कैलास कदम, संजय वढावकर तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Be First to Comment