निसर्ग
दिला निसर्गाने आमच्या
कोकणास समुद्र किनारा
वर्षतो दर वर्षी पाउस धारा
कित्येक वर्षे आहे समृद्ध व
समाधानी होता कोकण सारा ..
डौलाने डोलत होते आंबा नारळ
सुपारी काजू चे डौलादार वृक्ष
कित्येक वर्षांनन्तर या वादळाने
मिठीत घेऊन साधले आपले भक्ष
ग्रासले त्याने विस्तीर्ण वृक्षाना
उडवला या वादळाने पक्षी
प्राणी मानवाचा निवारा
झाली मने विशण्ण् झाला
भकास परिसर सारा ….
आले सरकारी पाहूणे दौरा
करण्या कोकणचा फिरणं
गेले हळहळून गेले पंधरा
दिवस झाले तरी नाही पत्ता
मदतीचा ..
राकट कणखर कोकणी माणूस
नाही भरोसा शासनाचे मदतीचा
पंधरा दिवस जाहले तरी पत्ता
नाही पाणी आणि विजेचा ..
जिद्दीने पेटून उठला सावरायचे
आपले आपल्याच लावतील वृक्ष
करेल कष्ट पण करणार नाही आत्महत्या
मिळेल पुन्हा त्यास दैवाची साथ
करेल कष्टाने तो निसर्गावर मात ..
अरूण देव, पेण
Be First to Comment